Sunday, July 11, 2010

मतदारांचा देव





आषाढी एकादशी म्हणजे वारकर्‍यांची खरी दिवाळी. सर्व विठ्ठलभक्तांचे लक्ष पंढरपुरी अडकलेले असते. वारकर्‍यांचा, सामान्य माणसांचा देव, विष्णूचा अवतार म्हणजेच पांडुरंग, पंढरपूरला कसा पोहोचला हे अनेकांना माहीतच नाही. जानुदेव आणि सत्यवतीचा मुलगा पुंडलिक अत्यंत आज्ञाधारक होता. दांडीरवनात हे तिघे आनंदाने राहात. मात्र लग्न झाल्यानंतर पुंडलिक आई-वडिलांचा छळ करू लागला. त्रासून त्यांनी काशीला जायचे ठरवले. काशीतच जीव जावा या विचाराने ते निघाले. हे ऐकून पुंडलिकच्या बायकोनेही सोबत जायचे ठरवले. पुंडलिक व त्याची पत्नी घोड्यावर बसून प्रवास करत व वृद्ध आई-वडिलांना चालायला लावत. कुकुटस्वामींच्या आश्रमात स्वारी रात्री थांबली. प्रवासाला दिलेल्या स्वल्प विरामातही आपल्या पालकांना कामाला लावले. रात्री झोपमोड झाली आणि पुंडलिकने एक विचित्र दृश्य पाहिले. सुंदर स्त्रियांनी आश्रमात प्रवेश केला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे कपडे गलिच्छ होते. आश्रम साफ करून त्या पूजाघरात जाऊन परतल्या आणि आता त्यांचे कपडे स्वच्छ वाटत होते. पुंडलिकने धाडस करून त्यांना विचारले ‘तुम्ही कोण?’ त्या म्हणाल्या, ‘आम्ही गंगा, यमुना, सरस्वती व इतर नद्या आहोत. तुझ्यासारखे दुष्ट व पापी नद्यांमध्ये आपली पापं धुतात आणि म्हणून आमचे कपडे गलिच्छ वाटतात. आई-वडिलांना वाईट वागवणार्‍याहून दुष्ट कुणीच नाही’. हे ऐकून पुंडलिक गडबडला. त्याला त्याची चूक कळली व तो बदलला. त्या दिवसानंतर त्याने त्याच्या आई-वडिलांची अफाट सेवा केली. या सेवेचा सुगंध भगवान विष्णूपर्यंत पोहोचला. लगेच विष्णुदेव वैकुंठाहून भूलोकावर प्रकट झाले. पुंडलिक आई-वडिलांची सेवा करण्यात तल्लीन होता. साक्षात परमेश्‍वर दार ठोकत असूनही मातृ व पितृभक्तीला तडा न देता तो कर्तव्यात पार बुडून गेला होता. त्याने देवाकडे वीट फेकली व त्यावर उभे राहून वाट पाहण्याचा आदेश दिला. विष्णू खरंच त्या विटेवर उभे राहून पुंडलिकची वाट पाहू लागले. नंतर देवाची माफी मागून ‘देवा तू इथेच रहा!’ अशी विनंती पुंडलिकाने केली. भक्ताचा मान राखला व विठोबाच्या रूपात विष्णुदेव पंढरपुरात स्थायिक झाले. त्याच ठिकाणी आज विठोबा विटेवर उभा आहे. प्रेमाने पंढरपुराचे ठेवलेले नाव आहे ‘भू-वैकुंठ’ महाराष्ट्रात तर विठोबाचे भक्त आहेतच तसे कर्नाटकातही तेवढेच भक्त असतील. ज्ञानेश्‍वर, नामदेव, चोखामेळा, तुकाराम, एकनाथ, सावतामाळी यांनी विठोबाच्या नामात रंग भरले व भक्तिरसात तल्लीन झाले. या संतांना वारकरी सांप्रदायाच्या वाटचालीला गती दिली.

दक्षिण हिंदुस्थानात विठोबाला ‘विठ्ठल’ असे नाव दिले गेले आहे. मराठी सामराज्य विजयनगरात असताना विठोबाची प्रचीती तिथे पसरली. हंपीचे देऊळ हे महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठे विठ्ठल मंदिर असेल. 15व्या शतकात बांधलेल्या या देवळात राजा कृष्ण देवरायने पंढरपूरमधील मूर्ती आणून ठेवली होती. मुगलांपासून वाचवण्याकरिता असे केले गेले. तीन मूर्ती संत एकनाथांच्या नातवाने म्हणजेच भानुदेसने पंढरपुरात परत आणली. खरं तर देव हा देव असतो, पण त्यातही माणूस वाद निर्माण करतोच. विठोबा हा विष्णू व शीव या दोघांचेही रूप आहे, पण तो नक्की वैश्य की शैव यावर अनेक संवाद केले जातात. माणूस भांडायची एकही संधी सोडत नाही. मला आश्‍चर्य हेच वाटते की बेळगाव प्रश्‍नाबरोबर विठोबा कोणाचा, महाराष्ट्राचा का कर्नाटकचा, हे पोस्टर अजून कसे लागले नाही. विठोबाचे भक्त अनेक आहेत. कुणी शिंपी, कुणी कुंभार, कुणी माळी तर कुणी सेवक. जात, पात, धर्म, वर्ण याला विठोबाकडे काहीच बंधन नाही. शुद्रांना अडवणूक झाली, पण विठ्याने त्यांचीही सोय केलीच.

कुर्मदास नावाचा विठोबाचा एक भक्त अपंग होता. लोळत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहोचायची जिद्द धरून पैठणहून निघाला. दिवस उलटले. एकादशी 3 दिवसांवर आली. आपण पोहोचू शकत नाही कळताच एका वारकर्‍याजवळ देवासाठी पत्र दिले. कुर्मदासाचे पत्र विठोबाच्या चरणी पडताच विठू उठून निघाले. ज्ञानदेव, नामदेव व सावतामाळी त्यांच्या मागोमाग गेले. शेवटी भक्त पोहोचू शकला तर विठोबाच त्याच्यापर्यंत पोहोचतो हे खरे. म्हणूनच तो सामान्यांचा देव मानला जातो. वैष्णवदेवी, तिरुपती, काली यांच्या चरणी सोनं, हिरे, पैसे, दागिने सर्वकाही अर्पण होत असते. उद्योगपती, क्रिकेट खेळाडू, अभिनेते, नेते, कोणतेही कार्य करण्याआधी या ठिकाणी जाऊन संपूर्ण खिसे खाली करतात. पण विठ्ठलाला भेटायला निघालेले अनेकदा घरदार विकून पंढरपूरपर्यंत पोहोचण्याचे विचार करतात. पाच-दहा रुपये टाकणारे हे भक्त संपत्तीचे दान नसतील देत, पण यांच्या भक्तीचा खजाना उघडला तर तिरुपतीत जमा झालेले सर्व धन फिके पडेल. मैलोन्‌मैल चालणारे विठ्ठलाचे भक्त हे जाणतात की, त्यांचा विठोबा फक्त भक्तीची भूक ठेवतो.

विठोबा हा फक्त देवच नाही तर अनेकांचा मित्र आहे. संतांच्या अभंगांतही आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तिशी साधल्यासारखे संवाद विठ्ठलाबरोबर मांडले आहेत. विठोबा माऊली म्हणून आईच्या रूपातही विठोबाला पाहिले जाते. देवाच्या परिभाषा जगात वेळोवेळी व सोयीप्रमाणे बदलत राहतात, पण माझ्याप्रमाणे देव हा आईसारखा असतो. आपले सारे गुन्हे माफ करणारा, चुका पदरात घालणारा, आपली वाट पाहात राहणारा व आपल्या मदतीला धावणारा. तुम्ही विठ्ठलापर्यंत पोहोचू नाही शकलाच तर तोच तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. या देशाचे भवितव्य मोठे श्रीमंत ठरवत नाहीत तर या देशातील सामान्य ठरवतात. जो या सामान्यांना नाखूश करेल तो कधीच टिकणार नाही. गोर-गरीबांचा वाली, विठोबा माऊली सर्व परिस्थितीवर डोळा ठेवून आहे. खुर्चीवर बसलेल्यांनी तिरुपती व वैष्णोदेवीच्या चकरा न मारता पंढरीची वारी घ्यायला हवी. कारण एक लक्षात घ्यावे, हा सामान्यांचा देव आहे...
म्हणजेच ‘मतदारांचा देव आहे...’


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवेभावे॥

99 क्लब




एक राजा होता. मोठे रामराज्य, नोकर-चाकर, शूर सैन्य, सर्व काही होते त्याच्याकडे, पण तरीही तो संतुष्ट नव्हता. दु:खात बुडून व वैफल्याच्या चिखलात माखलेल्या या राजाची अवस्था फारच वाईट होती. सहज राजवाड्यात फिरताना त्याने त्याच्या एका नोकराला गाणी गात साफसफाई करताना पाहिले. ही त्याच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट होती. आपल्याकडे एवढे सगळे असूनही आपण दु:खी आहोत आणि दोन पैसे कमावणारा आपला सेवक खूप आनंदी आहे हे कोडे त्याला उलगडत नव्हते.

उत्सुकता अनावर होताच राजाने सेवकाला विचारले, ‘‘तू एवढा आनंदात का आहेस?’’ त्यावर सेवक म्हणाला, ‘‘राजे, मी एक नोकर आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजाही मोजक्या आहेत. डोक्यावर छत व दोन वेळेस गरम जेवण मिळाले की आमचे भागते.’’ राजाला हे पटले नाही व आनंदी राहण्याचे हे कारण कसे असेल ही शंका दूर करण्यास त्याच्या एका खास मंत्र्याला या संवादाबद्दल सांगितले. मंत्री म्हणाला, ‘‘राजे तो सेवक ‘99 क्लब’चा सदस्य नसणार. त्याला आपण सदस्य करू, मग बदल पाहा.

’’ मंत्र्याने त्या सेवकाच्या घराबाहेर 99 सोन्याचे शिक्के ठेवले. ते मिळताच सेवक उल्हसित झाला. मोजल्यावर तो विचारात पडला, ‘‘99 शिक्के कुणी का ठेवेल. 1 नक्कीच कुणी घेतला असेल किंवा कुठेतरी पडला असेल.’’ आपला एक शिक्का कमी आहे या विचाराने त्याचे मन जळू लागले. तो कमावून आपण 100 शिक्क्याचा वाटा पूर्ण करायचाच या जिद्दीने तो कामाला लागला. दगदग, धडपड, तडजोड त्याच्या आयुष्याचा भागच झाले. कुटुंब मदत नाही करीत याची चीडचीड आणि नैराश्याने त्याला पछाडले. त्याने गाणेही बंद केले. हा बदल पाहून राजा स्तब्ध झाला. मंत्र्याला बोलावून त्याने हा बदल कसा घडला हे विचारले. मंत्री म्हणाला, ‘‘यालाच तर मी ‘99 क्लब’ म्हणतो. आता हा सेवक 99 क्लबचा सदस्य झाला आहे.’’
‘99 क्लब’ हे अशा माणसांच्या समूहाला दिले गेलेले नाव आहे, ज्यांच्याकडे खूप काही असूनही ते कधीच खूश नसतात. कारण ते 99 सोडून ‘1’ या संख्येमागे झुरत असतात. ‘ते एक मिळाले की सगळं चांगलं होईल, असे समजणारे संपूर्ण आयुष्य शोधात घालवितात. थोडक्यात मनुष्य सुखात राहू शकतो, पण काही मोठे हाती लागले की माणूस हावरा होतो. त्याला अजून हवे असे वाटू लागते. झोप, आनंद, आपल्यांची मनं, कुटुंबाचे हित, सर्व काही पणाला लावून माणूस हावरेपणाच्या आहारी जातो.


ऐषाराम आणि गरजा यातला फरक जाणून घ्या. गरजांवर नियंत्रण ठेवा. एका गोष्टीसाठी 99 गोष्टींना बेदखल करू नका. ‘99 क्लब’चे सदस्य होऊ नका

Rs. 500







In one of my training programmes, I started off my seminar by holding up a Rs.500 note in the room of 100, and I asked, "Who would like this Rs.500 note?"

Hands started going up.

I said, "I am going to give this Rs.500 to one of you but first, let me do this.

I proceeded to crumple up the Rs.500 note. I then asked, "Who still wants it?"

Still the hands were up in the air. Well, I replied, "What if I do this?" And I dropped it on the ground and started to grind it into the floor with my shoe.

I picked it up, now crumpled and dirty.

"Now, who still wants it?" Still the hands went into the air.

My friends, we have all learned a very valuable lesson. No matter what I did to the money, you still
wanted it because it did not decrease in value.

It was still worth Rs.500. Many times in our lives, we are dropped, crumpled, and ground into the dirt by the decisions we make and the circumstances that come our way.

We feel as though we are worthless. But no matter what has happened or what will happen, you will never lose your value. Dirty or clean, crumpled or finely creased, you are still priceless to those who
DO LOVE you.

The worth of our lives comes not in what we do or who we know, but by WHO WE ARE.

You are special- Don't EVER forget it."

You may never know the lives it touches, the hurting hearts it speaks to, or the hope that it can bring.
Count your blessings, not your problems.

And remember: Amateurs built the Ark . Professionals built the Titanic.

If God brings you to it - He will bring you through it.