Saturday, August 7, 2010

रेखा नसलेला अमिताभ





1987 मध्ये रमेश देव यांच्या शेजारी बसून ‘सर्जा’ हा चित्रपट पाहिलेला मला आठवतो. अजिंक्यचा अभिनय व त्याच्या अभिनयाने भाळलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून त्यांच्या भावना उचंबळून आल्या होत्या. उंच, देखणा आणि उत्तम अभिनय गुण यांचा संयोग म्हणजेच अजिंक्य, असे सर्वांना वाटत होते. ‘हिंदीतल्या हीरोंसारखाच आहे आपला हा मराठीतला हीरो’ असेदेखील माझ्या कानावर पडत राहिले. 1989 मधील सलमानची चित्रपटसृीतील एण्ट्री ही ‘मैने प्यार किया’मध्ये गाजली. तेव्हा अजिंक्य आणि सलमानची तुलनादेखील झालेली मी विसरणार नाही. सलमान टिकला पण अजिंक्य गायबच झाला. सर्जा, अर्धांगी, शाब्बास सूनबाई, कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटांनंतर अजिंक्य अमेरिकेला गेला. नेब्रास्का लिंकन युनिर्व्हसिटीत पुढील शिक्षण संपवून परतण्याचा त्याचा बेत होता. बी.एस.सी.नंतरचे शिक्षण घेऊन परदेशातून परत आल्यावर त्याला खूप फरक जाणवला. सिनेमा जगताला वाटले अजिंक्य आता परतणारच नाही.

‘जग कुणासाठी थांबत नाही हे मला तेव्हा कळले,’ असे अजिंक्य आजही सांगतो. मोठ्या कलाकाराचा मुलगा म्हणजे त्याला कसला त्रास असा सामान्य जनतेचा समज असतो, पण तसे नसते. वटवृक्षाखाली इतर झाडं वाढू शकत नाहीत. मोठ्या कलाकारांच्या मुलांची तुलना सतत त्यांच्या आई-वडिलांशी केली जाते. आई-वडिलांवर ज्यांचा रोष असतो तोही मुलांवर काढला जातो. तसेच काहीतरी अजिंक्यबरोबरही झाले. सर्जाने त्याला खूप मोठे केले, पण तो मराठी पडद्यासाठी मोठा आणि हिंदी पडद्यासाठी छोटा म्हणून नेहमीच वगळला गेला. कार्यक्षमता असूनही बाप मोठा की मुलगा मोठा या तराजूत तोलून त्याचा भाव लावला गेला. स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे म्हणून तो दुसर्‍यांकडे काम नाही करणार हा गैरसमज बाळगून त्याला विचारायलाही लोक संकोच करत. मी अजिंक्यला म्हटले, ‘‘तुझा साधेपणा आणि चांगलेपणाच तुला नडला.’’ आणि याच साधेपणाने त्याने हे मान्यही केले. उगाच कुणाशी भेटीगाठी नाही, चमचेगिरी नाही, रात्रीच्या पार्ट्या नाहीत म्हणून या सिनेमासृीशी दुरावलेला अजिंक्य मात्र आपल्या विश्‍वात खूपच आनंदी असतो. त्याच्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान ठेवा म्हणजे त्याची पत्नी आरती व त्याची मुलं आर्य आणि तनया. त्यांच्याबद्दल बोलताना त्याचा चेहरा अगदी खुलून दिसतो. आर्य 18 वर्षांचा झाला आहे आणि अजिंक्यचा जवळचा मित्रही. दिनार आणि सतीश हे दोघे त्याचे खास दोस्त. चांगले-वाईट दिवस, सगळं काही भोगताना हे दोघे अजिंक्यसोबत उभे राहतात. या क्षेत्रात असल्याचे श्रेय तो त्याच्या शाळेतील तळपदे मॅडम यांनाही देतो. बी.पी.एम. शाळेतील त्याच्या शिक्षिकेने त्याला खूप प्रोत्साहन दिले.

बोलता बोलता अजिंक्यने एक किस्सा सांगितला. वांद्य्राच्या एका स्टुडिओमध्ये रंगलानी नावाच्या एका प्रोड्युसरची शूटिंग सुरू होती. दिग्दर्शकाला सांगून अजिंक्य दहा मिनिटे उशिरा पोहोचला. सर्वांच्या देखत रंगलानी यांनी अजिंक्यला खूप सुनावले. मराठी माणसं किती बेशिस्त व नालायक यावर चांगले भाषणच ठोकले. परवानगी घेऊनही हे सगळे ऐकायला लागले याचे खूप वाईट वाटले अजिंक्यला. पण त्याने एकही शब्द काढला नाही. मराठी माणूस सरळ आहे. साध्यासारखा वागतो व अन्याय सहन करण्याच्या सर्व सीमा पार करतो. इथेच त्याचे चुकते. हे बोलताना अजिंक्यतील ‘अँग्री यंग मॅन’ जागा झालेला मला लक्षात आला. स्वत:च्या मेहनतीचे पैसे मागायला लाजणारा खूप काही बोलून गेला या एका वाक्यात. अनेकांनी खडे, गंडे घालण्याचे सल्ले दिले. नाव बदलण्यासंदर्भात चर्चा केली, पण अजिंक्यने फक्त चांगले काम करण्यात विश्‍वास ठेवला. छोटे, सोपे बदल केलेही. पण ‘अजिंक्य कुमार’सारखे बदल त्याला कधी करावेसे वाटले नाहीत. मजेत तो म्हणतो, लोकांचं काही खरं नाही. ‘अजिंक्य खान’सुद्धा करायला सांगतील. माणूस म्हणून अजिंक्य अत्यंत यशस्वी आहे. रमेश देव प्रॉडक्शन ही कंपनी तो व त्याचा भाऊ अभिनय सांभाळतात. कोळसा व्यापारातही त्याची गुंतवणूक आहे. पण अभिनेता म्हणून खूप मोठे व्हायचे स्वप्न अजून पूर्ण नाही झाले असे तो म्हणतो. तणाव जाणवला की तो ‘जीम’मध्ये जाऊन कसरत करतो. त्यातून त्याला खूप शांतता मिळते. घरी बसून चित्रपट पाहणे ही त्याच्या आवडीची गो. वेळ मिळाला की ऊठसूट पुण्याला फेर्‍या मारणे हा त्याचा मला न समजणारा छंद. ‘मला पुणे खूप आवडते’ हे म्हणताना तो आताच निघेल पुण्याच्या दिशेने असे हावभाव असतात.

अजिंक्यचे नाव आई-वडिलांनी अगदी बरोबर ठेवले आहे. परिस्थिती अजिंक्यला हरवू शकणार नाही. त्याचे स्वप्न हेच त्याचे आयुष्य. वासुदेव बळवंत फडकेंसारखा उत्कृ मराठी सिनेमा काढणार्‍याने स्वप्न पाहातच राहावे हे माझे म्हणणे. कारण स्वप्नं त्याचीच पूर्ण होतात जो स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवतो आणि ही हिंमत अजिंक्यकडे खूप आहे.
6 ऑगस्टला रिलीज झालेला त्याचा चित्रपट ‘जेता’ हा आयुष्याकडे पाहण्याचा त्याचाच दृकिोन आहे असे मला वाटते. प्रत्येकाला जिंकण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येकात एक जेता असतो हे खरंच आहे. फक्त आपल्यातल्या जेत्याला जागे करावे लागते. अजिंक्य अमिताभचा फारच मोठा फॅन आहे. अमिताभसारखे होण्यासाठीच मी या क्षेत्रात आलो असे तो सांगतो. पण तसे झाले नाही याची त्याला खंत आहे. ‘अमिताभला’ ‘अमिताभ’ होण्यासाठी खूप काही सोसावे लागले. कंपनी बुडल्याचे दु:ख, कुलीतील अपघात, कर्जाचे ओझे, अपमान हे सर्व काही झेलूनच आज तो अभिनयाचा राजा झालाय. माझे आयुष्य सुखाचे गेले. आई-वडिलांचे प्रेम व आधाराने तसे सर्व काही हवे तसेच घडले. कधी हात पसरावे लागले नाहीत की मान खाली घालावी लागली नाही. म्हणूनच एखाद्वेळी अमिताभ झालो नाही हेच त्याचे पृथक्करण. पण माझे मत वेगळे आहे. नशिबाची रेखा ठळक असणे फार महत्त्वाचे असते. काच्या सोबत ही रेखाही गरजेची ठरते.

अजिंक्य हा खरोखरच अमिताभ होण्याचे सामर्थ्य ठेवतो. त्याचे दिसणे, वागणे, अभिनय कुठेही कमी पडत नाही. फक्त नशिबाच्या रेखेची सध्या साथ नाही एवढेच. पण हा ठळक रेखा नसलेला अमिताभ जरी ‘अमिताभ’ नाही होऊ शकला तरी काय. तो ‘अजिंक्य’ आहे. तू अमिताभ होण्याचा प्रयत्न सोड, कारण ‘अजिंक्य’वर लोकांचे खूप प्रेम आहे आणि त्यातच तुझी खरी जीत आहे. अमिताभ हा एक विचार आहे आणि त्या विचारांचा सारांश म्हणजे तुझा ‘जेता’. सर्वांनी हा चित्रपट पाहावा व स्वत:तील जेत्याला जागे करावे ही माझी इच्छा. नशिबाची रेखा नकोच तुला. तुझे स्वप्न पुरे आहे तुझे ध्येय गाठण्यासाठी. अमिताभ कशाला व्हायचे.

तू ‘अजिंक्यच’ रहा!!

कुबड्या वाटू नका



लोकांना मदत करणे हा फारच चांगला गुण आहे. कॅार्पोरेट जगतात तर याची फारच गरज असते. एकमेकांना सहाय्य करूनच प्रगतीचा डोंगर ओलांडता येतो, पण मदत करणे आणि एखाद्याला आपल्या आश्रयावर अवलंबून ठेवणे यात फरक आहे. आपले स्थान स्थिर करण्यासाठी आपण दुसर्‍याला अपंग करणे याला मदत नाही, गुन्हा म्हणतात. कधी कधी प्रेमाखातर आपण आपल्यांना संरक्षणाच्या भावनेत घुसमटून टाकतो. जगाशी संपर्क साधण्यापासून दूर ठेवून त्याच्या प्रगतीच्या प्रवासातील गतिरोधक बनत राहतो. धोक्याची भीती बाळगून न जगणे व न जगू देणे हा मूर्खपणाच होय. एक गो सांगते, एका माणसाला एका किड्याचा कोश सापडला. त्या कोशाला जवळून पाहता त्याच्या एका बाजूला भोक दिसले. त्या भोकातून एक फुलपाखरू बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आढळले. त्या फुलपाखराची धडपड व झटापट त्या माणसाला बघवत नव्हती. फुलपाखराने धीर सोडल्यासारखे वाटले. धडपड थांबवली. ते थकले बहुतेक. माणसाला दया आली व त्याने त्या फुलपाखराला मदत करायचे ठरवले. त्या कोशाचा पुढला भाग कात्रीने कापून त्याने थोडा मोठा केला. असे करताच ते फुलपाखरू सहजपणे बाहेर पडले, पण ते बाहेर येताच कोलमडून पडले. माणसाला आश्‍चर्य वाटले. त्याची अपेक्षा होती की बाहेर पडताच त्या फुलपाखराने सुंदर पंख पसरावे व आपल्या शरीराला आधार देऊन या जगाची सुंदरता वाढवावी, पण तसे काहीच झाले नाही. झाले काय तर त्या फुलपाखराचे आयुष्य कोमेजून गेले. ते उडूच शकले नाही. तेव्हाही नाही आणि कधीच नाही. माणसाने तर मदत केली, पण मग ही चांगली भावना असून असे का झाले असेल? त्याचेही कारण आहे. फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्याकरिता खूप जोर लावते. हा जोर लावल्यामुळेच पंखांमध्ये आवश्यक प्रवाही पदार्थ जमा होतो व पंख मजबूत होतात. असे झाले की मग फुलपाखरू भरारी घेऊ शकते. त्या दानशूर माणसाने फुलपाखराला मदत केली असे त्याला वाटले, पण खरे तर त्या फुलपाखराला त्याच्या जीवनावश्यक अनुभवापासून दूर केले. बर्‍याचदा संघर्ष ही आपली गरज असते. जर त्या संघर्षातून आपण स्वत:ला लपविण्याचा प्रयत्न केला तर आपणही कोलमडून पडू अगदी या फुलपाखरासारखेच. आपल्या पंखात आत्मविश्‍वास वाढू द्या. जीवनात उंच भरार्‍या घ्यायच्या असतील तर संघर्ष चुकवून चालणार नाही. तसेच कुणालाही मदत करताना हा विचार करा. ‘तुम्ही पंख कापताय की त्यांना बळ देताय?’ बळ द्या, अपंग नका करूत. मदत करा. खूप मदत करा. आत्मविश्‍वास व धाडस वाटा. कुबड्या वाटू नका.

Monday, August 2, 2010

साबरमतीचा संत



एक आटपाट नगर होते. त्यात एक अती प्रेमळ व निष्ठावंत दहशतवादी राहत होता. अर्थात प्रेमळ व निष्ठावंत कारण दहशतवादावर त्याचे खूप प्रेम होते आणि विध्वंस माजवणे हेच त्याचे ध्येय होते. त्याची महिमा नक्कीच अपार असणार. कारण मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत पोलीस त्याच्या शोधात होते. एवढी महान कीर्ती असतानाही सरकार त्याला किरकोळ गुन्हेगार म्हणून त्याचा सतत अपमान करी. दहशतवादी म्हटले की, गोळीबार, स्फोट, मारामार्‍या, चकमकी आल्याच. त्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणार्‍या त्याच्या पत्नीचा व त्याचा खेळ संपला. दोघेही पोलिसांच्या हाती ठार झाले. खरे सांगायचे तर एक दहशतवादी मेला हे चांगले की वाईट यावर विचार करावासा वाटतो. कारण मलेरियाचा डास मारणे म्हणजे जीवहत्या समजली जाणार असेल तर कमालच आहे. ते आटपाट नगर म्हणजे हिंदुस्थानातील प्रगतीचे प्रतीक गुजरात आणि तो प्रेमळ दहशतवादी म्हणजे सरकारचा किरकोळ गुन्हेगार सोहराबुद्दीन. या संपूर्ण चकमकीचे खापर आज अमित शहा यांच्यावर फोडले गेले आहे. सोहराबुद्दीन-कौसरबी एन्काऊंटरचा सूत्रधार समजल्या जाणार्‍या शहांबद्दल लोकांना फार जास्त माहिती नाही. गलिच्छ, पान चावणार्‍या, साहेब साहेब कोकलत चमचेगिरी करणारा किंवा टीव्हीवर स्वत:ला प्रसिद्धी मिळवून घेणार्‍या फुकट्या आणि अनाडी नेत्यांसारखे नाहीत ते. अमित शहा हे बायोकेमिस्ट्री या विषयाचे पदवीधर. कॉलेजमध्ये असल्यापासून शहांचे राजकारणाबद्दलचे कुतूहल दिसून येई. गांधीनगर येथे श्रीमंत घरात जन्माला आलेले शहा यांचे पोट भरलेले होते व राजकारण ही गरज नसून आवड व स्वप्न होते. अहमदाबादमधील सी. यू. शहा कॉलेजमधून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. कॉलेजमधील निवडणूक जरी ते हरले तरी 1995 मध्ये यतीन ओझा यांचा पोल मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले. साबरमती विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत ओझांनी कॉंग्रेसच्या नरहरी अमीन या धट्ट्याकट्ट्या उमेदवाराला हरवले. म्हणून शहा यांचा राजकारणाचा अभ्यास दिसून आला. भारतीय जनता पार्टीच्या रा्रीय परिषदेत अमित शहांचे नाव खूप गाजले. वडोदर्‍याला झालेल्या या परिषदेच्या वेळी केशूभाई पटेल मुख्यमंत्री होते. नव्वदीतल्या त्या काळात शहा हे मोठे नाव होऊ लागले. 1997 च्या निवडणुकीत सरखेज मतदारसंघांतून शहा जिंकले. 2002 मध्येदेखील त्यांनी ही जागा जिंकली. विधानसभेच्या 182 जागांमधून 126 जागा मिळवून कॉंग्रेसला नाकीनऊ आणण्यात शहांनी मोदींना खूपच मदत केली. 1.58 लाखांच्या फरकाने जिंकून आलेले अमित अनिलचंद्र शहा यांना गोवर्धन झडीकया यांची जागा देऊन गृहमंत्री करण्यात आले. बँकांवर असलेला कॉंग्रेसचा दबदबा शहांनी कमी केला व क्रिकेट असोसिएशनही आपल्याच हाती असावे या दिशेने काम सुरू केले. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोदी झाले ही शहांचीच दूरदृी. 2007 मध्ये 2.35 लाख मतांच्या आघाडीने सरखेजची निवडणूक जिंकून शहांनी या क्षेत्रातील आपला आवाका सिद्ध केला. गुजरात म्हणजे विकासाची कार्यशाळा समजले जाते. हे राज्य आपोआप प्रगतशील झाले नाही. नेते व जनता यांच्या एकजुटीनेच आज या राज्याला उत्कर्षाचे दिवस दिसत आहेत, पण या जगाचा नियम आहे. कुणी पुढे जायला लागले की, त्याचे पाय खेचले जातात. गरीबाला गरीबच ठेवा ही कॉंग्रेसची युक्ती मोडून आणणार्‍यांची भरभराट सरकारला पाहवली नाही. या पुढे जाणार्‍या राज्याला थांबविण्याचा सोपा उपाय म्हणजे आक्रमण. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात लखलखताना दिसल्यामुळे त्यांचे हात कापण्याचा प्रयत्न म्हणजेच अमित शहा यांची सीबीआय इन्क्वायरी. सोहराबुद्दीनच्या भावाने रुबाबुद्दीनने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जाने आज एका दहशतवाद्यासाठी एका गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले. सोहराबुद्दीन कुणी संत असता तर गो वेगळी असती, पण ज्याच्या घरात 40 एके-47 रायफली, 100 हॅण्डग्रेनेडस् आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडतो त्याच्यासाठी तुम्ही काय काय करणार? शहांना दोन तासांची मुदत देऊन पोहोचता न आल्यामुळे ते इन्क्वायरीत साथ देत नाहीत असे मीडियाला कळवणे म्हणजे रचलेले नाटकच वाटते. काही तासांत 30 हजार पानांची चार्जशीट सीबीआयने दाखल करणे हेही काही शक्य असे वाटत नाही. काही गोींना वर्षे लागतात, पण नको तिथे दिसणारा सीबीआयचा वेग विचार करायला लावतो. सामान्य माणसाला राजकारण समजते, पण कॉंग्रेसचे पोरखेळ समजायला फारच डोके लढवावे लागेल. महागाईच्या भुताने पछाडलेल्या जनतेला जिथे दोन वेळा जेवायचे वांधे झाले आहेत त्याच देशात एका आतंकवादी संघटनेच्या सदस्यांसाठी होणारी बोंबाबोंब पाहून जीव तुटतो, पण कोण काय करणार! अमित शहांनी गुजरातसाठी जे केले ते कुणीही विसरणार नाही. दिल्ली व सीबीआयचे मत किंवा ध्येय काहीही असो, जनतेचा पाठिंबा अजूनही शहांबरोबरच आहे. मुंबईत झालेल्या हल्ल्यात कामटे, साळसकर, करकरे, ओंबळे मारले गेले. त्यांना मारणारे असे अनेक अजूनही फिरत आहेत. त्यांचे काय करायचे आता? दुर्दैव असे की, जेवढे आतंकवादी आहेत तेवढेच त्यांच्या मानवाधिकारांसाठी लढणारे वेडे आहेत, पण यांना कोण समजावणार की मानवाधिकार माणसांसाठी असतात, राक्षसांसाठी नसतात. असे कधी घडू नये, पण परत मुंबईत ‘26/11’ सारखा हल्ला झाला किंवा देशात कुठेही कसाबसारखा ‘कसाई’ आढळला तर कोणताही पोलीस अधिकारी त्याला मारण्याची हिंमत करणार नाही. अमित शहांनी काय केले ते स्वत:च सिद्ध करतील, पण राज्याच्या गृहमंत्र्याला एखाद्या दहशतवाद्याला मारण्याचे आदेश देण्याचीही सोय नसेल तर मग राज्य कसे चालायचे! शहांवर केलेला 30 हजार पानांचा सीबीआय रिपोर्ट रद्दीत विकला तर एक गरीब तरी निदान सुखाने दोन वेळचे खाऊ शकेल. महागाईवरून लक्ष काढण्यासाठी आपलाच पैसा नसत्या कामात जातोय. निष्कर्ष एवढाच, आपण भरलेला कर, देशाची संपत्ती, दहशतवाद्यांच्या मानवाधिकारांसाठीच संपणार. आपण कसाबसाठी वर्ल्ड बँकेकडून कर्जही काढू. तिस्ता सेटलवाडना हे नक्कीच आवडेल.
या ‘आठवड्याचा माणूस’ भाग्यवान आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक यांनी ज्या तुरुंगात स्वातंत्र्याच्या लढ्यात तुरुंगवास भोगला त्याच साबरमतीच्या ऐेतिहासिक तुरुंगात अमित शहांना सीबीआयने ठेवले आहे. सरदार पटेल यांचे नाव दिलेल्या सरदार बॅरेकमध्ये शहांनी 14 दिवस काढल्यावर सरदार पटेलांचे गुण त्यांच्यात अजून ठळक दिसतील. या तुरुंगाने मोठमोठ्यांना अजून मोठे केले. याच तुरुंगात सामान्य माणसांचे संतमहात्मेही झाले. हा तुरुंगच शहांना धीर देईल. खोटेपणा व दहशतवादाचा पराभव व्हावा आणि 14 दिवसांनी सत्याच्या जोरावर साबरमतीचा अजून एक संत बाहेर पडावा.

मैत्री की पार्टनरशिप?




मैत्रीचे नातेच वेगळे असते. कारण त्यात कोणताही कॉन्ट्रॅक्ट किंवा कागदपत्र नसतात. आपण आई-वडील, भाऊ-बहीण निवडू शकत नाही. पण ‘मित्र’ कोण असावे हे आपण स्वत:च ठरवतो. मग हे नाते सांभाळावे कसे हेही आपल्यालाच पहावे लागते. दोन मित्र जेव्हा अगदी खास होतात तेव्हा बर्‍याचदा त्यांना एकदम काम करावे असा विचारही येतो. अशा अनेक जोड्या व्यवहारात दिसून येतात. एकत्र धंदा करण्यासाठी पार्टनरशिप करतात, पण हा इतिहास आहे पैशाचा आवळ बसला की मैत्रीला गळफास लागतो. व्यवहाराच्या स्वार्थी समुद्रात नाती बुडून मरण पावतात. एकमेकांच्या सुख-दु:खात चिकटून दिसणारे एकमेकांची तोंडं पहायलाही नकार देतात. प्रगती, चढाओढ, कमाई हे सर्व गरजेचेच, पण काही नात्यांना यातून वगळलेच पाहिजे. सख्खे भाऊ एक दुसर्‍याला खाली पाडून आपला धंदा मोठा करण्याचा प्रयत्न करतात तर मग काय. मित्रांनी एकदम धंदा करू नये असे माझे मत नाही; पण केला तर त्यात मैत्री जास्त आणि फायदा कमी पहावे आणि हे एकतर्फा असून चालायचे नाही. मित्रांबरोबर धंदा करण्याआधी नियम नीट ठरवा. या सर्व घडामोडीत धंदा आणि पार्टनरशिप मोठी की नाते हे सुरुवातीलाच स्वत:ला सांगा. हे सर्व पाळूनही कधी कधी मतभेद होऊ शकतात. पार्टनरशिप तुटू शकते. मैत्रीला तडा जाऊ शकतो. असे होऊ नये, पण असे झालेच तरी मैत्री विसरू नका. असे नेहमी पाहिले जाते की पार्टनरशिप तुटली की पार्टनरबद्दल नको नको ते बोलले जाते, आपण किती सरळ असून आपल्याला दगा दिला गेला याचे प्रदर्शन भरवले जाते. तडा गेलेल्या मैत्रीचा मग चर्राच होतो. पार्टनरशिप तोडा वाटल्यास, पण मैत्री तोडू नका. सॉक्रेटस नावाचा एक खूप मोठा ज्ञानी होता. तत्त्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून लोक त्याला मानत. त्याच्या एका घनिष्ठ मित्राचे व त्याचे काही विषयावरून मतभेद झाले. त्यांचे ठरवलेले काम ठप्प पडले. याच काळात त्याचा एक नातेवाईक आला व त्याच्या तुटलेल्या मैत्रीवर टीका करू लागला. तुझ्या मित्राबद्दलची एक सॉलिड माहिती देऊ का?’’ असे त्याने सॉक्रेटसला विचारले. सॉक्रेटस म्हणाला, आधी तीन प्रश्‍नांची उत्तर दे!
‘‘ती माहिती खरी आहे का?’’ नातेवाईक म्हणाला, ‘‘माहीत नाही.’’
‘‘ती माहिती चांगली आहे का?’’ नातेवाईक म्हणाला, ‘‘अजिबात नाही.’’
‘‘ती माझ्या उपयोगाची आहे का?’’... ‘‘नाही.’’
‘‘जर ती माहिती खरी नाही, चांगली नाही आणि माझ्या उपयोगाचीही नाही, मग मी का ऐकू.’’ असे म्हणून सॉक्रेटसने आपली मैत्री सिद्ध केली. व्यवहार आणि मैत्री नेहमीच वेगळी ठेवा. मैत्रीचे स्थान खोल हृदयात असते. तिला पैशाखाली तुडवून कोर्टात खेचू नका. ‘मैत्री आणि पार्टनरशिप’ दोन्ही नीट चालेल यावर लक्ष ठेवा.

Sunday, July 11, 2010

मतदारांचा देव





आषाढी एकादशी म्हणजे वारकर्‍यांची खरी दिवाळी. सर्व विठ्ठलभक्तांचे लक्ष पंढरपुरी अडकलेले असते. वारकर्‍यांचा, सामान्य माणसांचा देव, विष्णूचा अवतार म्हणजेच पांडुरंग, पंढरपूरला कसा पोहोचला हे अनेकांना माहीतच नाही. जानुदेव आणि सत्यवतीचा मुलगा पुंडलिक अत्यंत आज्ञाधारक होता. दांडीरवनात हे तिघे आनंदाने राहात. मात्र लग्न झाल्यानंतर पुंडलिक आई-वडिलांचा छळ करू लागला. त्रासून त्यांनी काशीला जायचे ठरवले. काशीतच जीव जावा या विचाराने ते निघाले. हे ऐकून पुंडलिकच्या बायकोनेही सोबत जायचे ठरवले. पुंडलिक व त्याची पत्नी घोड्यावर बसून प्रवास करत व वृद्ध आई-वडिलांना चालायला लावत. कुकुटस्वामींच्या आश्रमात स्वारी रात्री थांबली. प्रवासाला दिलेल्या स्वल्प विरामातही आपल्या पालकांना कामाला लावले. रात्री झोपमोड झाली आणि पुंडलिकने एक विचित्र दृश्य पाहिले. सुंदर स्त्रियांनी आश्रमात प्रवेश केला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे कपडे गलिच्छ होते. आश्रम साफ करून त्या पूजाघरात जाऊन परतल्या आणि आता त्यांचे कपडे स्वच्छ वाटत होते. पुंडलिकने धाडस करून त्यांना विचारले ‘तुम्ही कोण?’ त्या म्हणाल्या, ‘आम्ही गंगा, यमुना, सरस्वती व इतर नद्या आहोत. तुझ्यासारखे दुष्ट व पापी नद्यांमध्ये आपली पापं धुतात आणि म्हणून आमचे कपडे गलिच्छ वाटतात. आई-वडिलांना वाईट वागवणार्‍याहून दुष्ट कुणीच नाही’. हे ऐकून पुंडलिक गडबडला. त्याला त्याची चूक कळली व तो बदलला. त्या दिवसानंतर त्याने त्याच्या आई-वडिलांची अफाट सेवा केली. या सेवेचा सुगंध भगवान विष्णूपर्यंत पोहोचला. लगेच विष्णुदेव वैकुंठाहून भूलोकावर प्रकट झाले. पुंडलिक आई-वडिलांची सेवा करण्यात तल्लीन होता. साक्षात परमेश्‍वर दार ठोकत असूनही मातृ व पितृभक्तीला तडा न देता तो कर्तव्यात पार बुडून गेला होता. त्याने देवाकडे वीट फेकली व त्यावर उभे राहून वाट पाहण्याचा आदेश दिला. विष्णू खरंच त्या विटेवर उभे राहून पुंडलिकची वाट पाहू लागले. नंतर देवाची माफी मागून ‘देवा तू इथेच रहा!’ अशी विनंती पुंडलिकाने केली. भक्ताचा मान राखला व विठोबाच्या रूपात विष्णुदेव पंढरपुरात स्थायिक झाले. त्याच ठिकाणी आज विठोबा विटेवर उभा आहे. प्रेमाने पंढरपुराचे ठेवलेले नाव आहे ‘भू-वैकुंठ’ महाराष्ट्रात तर विठोबाचे भक्त आहेतच तसे कर्नाटकातही तेवढेच भक्त असतील. ज्ञानेश्‍वर, नामदेव, चोखामेळा, तुकाराम, एकनाथ, सावतामाळी यांनी विठोबाच्या नामात रंग भरले व भक्तिरसात तल्लीन झाले. या संतांना वारकरी सांप्रदायाच्या वाटचालीला गती दिली.

दक्षिण हिंदुस्थानात विठोबाला ‘विठ्ठल’ असे नाव दिले गेले आहे. मराठी सामराज्य विजयनगरात असताना विठोबाची प्रचीती तिथे पसरली. हंपीचे देऊळ हे महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठे विठ्ठल मंदिर असेल. 15व्या शतकात बांधलेल्या या देवळात राजा कृष्ण देवरायने पंढरपूरमधील मूर्ती आणून ठेवली होती. मुगलांपासून वाचवण्याकरिता असे केले गेले. तीन मूर्ती संत एकनाथांच्या नातवाने म्हणजेच भानुदेसने पंढरपुरात परत आणली. खरं तर देव हा देव असतो, पण त्यातही माणूस वाद निर्माण करतोच. विठोबा हा विष्णू व शीव या दोघांचेही रूप आहे, पण तो नक्की वैश्य की शैव यावर अनेक संवाद केले जातात. माणूस भांडायची एकही संधी सोडत नाही. मला आश्‍चर्य हेच वाटते की बेळगाव प्रश्‍नाबरोबर विठोबा कोणाचा, महाराष्ट्राचा का कर्नाटकचा, हे पोस्टर अजून कसे लागले नाही. विठोबाचे भक्त अनेक आहेत. कुणी शिंपी, कुणी कुंभार, कुणी माळी तर कुणी सेवक. जात, पात, धर्म, वर्ण याला विठोबाकडे काहीच बंधन नाही. शुद्रांना अडवणूक झाली, पण विठ्याने त्यांचीही सोय केलीच.

कुर्मदास नावाचा विठोबाचा एक भक्त अपंग होता. लोळत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहोचायची जिद्द धरून पैठणहून निघाला. दिवस उलटले. एकादशी 3 दिवसांवर आली. आपण पोहोचू शकत नाही कळताच एका वारकर्‍याजवळ देवासाठी पत्र दिले. कुर्मदासाचे पत्र विठोबाच्या चरणी पडताच विठू उठून निघाले. ज्ञानदेव, नामदेव व सावतामाळी त्यांच्या मागोमाग गेले. शेवटी भक्त पोहोचू शकला तर विठोबाच त्याच्यापर्यंत पोहोचतो हे खरे. म्हणूनच तो सामान्यांचा देव मानला जातो. वैष्णवदेवी, तिरुपती, काली यांच्या चरणी सोनं, हिरे, पैसे, दागिने सर्वकाही अर्पण होत असते. उद्योगपती, क्रिकेट खेळाडू, अभिनेते, नेते, कोणतेही कार्य करण्याआधी या ठिकाणी जाऊन संपूर्ण खिसे खाली करतात. पण विठ्ठलाला भेटायला निघालेले अनेकदा घरदार विकून पंढरपूरपर्यंत पोहोचण्याचे विचार करतात. पाच-दहा रुपये टाकणारे हे भक्त संपत्तीचे दान नसतील देत, पण यांच्या भक्तीचा खजाना उघडला तर तिरुपतीत जमा झालेले सर्व धन फिके पडेल. मैलोन्‌मैल चालणारे विठ्ठलाचे भक्त हे जाणतात की, त्यांचा विठोबा फक्त भक्तीची भूक ठेवतो.

विठोबा हा फक्त देवच नाही तर अनेकांचा मित्र आहे. संतांच्या अभंगांतही आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तिशी साधल्यासारखे संवाद विठ्ठलाबरोबर मांडले आहेत. विठोबा माऊली म्हणून आईच्या रूपातही विठोबाला पाहिले जाते. देवाच्या परिभाषा जगात वेळोवेळी व सोयीप्रमाणे बदलत राहतात, पण माझ्याप्रमाणे देव हा आईसारखा असतो. आपले सारे गुन्हे माफ करणारा, चुका पदरात घालणारा, आपली वाट पाहात राहणारा व आपल्या मदतीला धावणारा. तुम्ही विठ्ठलापर्यंत पोहोचू नाही शकलाच तर तोच तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. या देशाचे भवितव्य मोठे श्रीमंत ठरवत नाहीत तर या देशातील सामान्य ठरवतात. जो या सामान्यांना नाखूश करेल तो कधीच टिकणार नाही. गोर-गरीबांचा वाली, विठोबा माऊली सर्व परिस्थितीवर डोळा ठेवून आहे. खुर्चीवर बसलेल्यांनी तिरुपती व वैष्णोदेवीच्या चकरा न मारता पंढरीची वारी घ्यायला हवी. कारण एक लक्षात घ्यावे, हा सामान्यांचा देव आहे...
म्हणजेच ‘मतदारांचा देव आहे...’


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवेभावे॥

99 क्लब




एक राजा होता. मोठे रामराज्य, नोकर-चाकर, शूर सैन्य, सर्व काही होते त्याच्याकडे, पण तरीही तो संतुष्ट नव्हता. दु:खात बुडून व वैफल्याच्या चिखलात माखलेल्या या राजाची अवस्था फारच वाईट होती. सहज राजवाड्यात फिरताना त्याने त्याच्या एका नोकराला गाणी गात साफसफाई करताना पाहिले. ही त्याच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट होती. आपल्याकडे एवढे सगळे असूनही आपण दु:खी आहोत आणि दोन पैसे कमावणारा आपला सेवक खूप आनंदी आहे हे कोडे त्याला उलगडत नव्हते.

उत्सुकता अनावर होताच राजाने सेवकाला विचारले, ‘‘तू एवढा आनंदात का आहेस?’’ त्यावर सेवक म्हणाला, ‘‘राजे, मी एक नोकर आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजाही मोजक्या आहेत. डोक्यावर छत व दोन वेळेस गरम जेवण मिळाले की आमचे भागते.’’ राजाला हे पटले नाही व आनंदी राहण्याचे हे कारण कसे असेल ही शंका दूर करण्यास त्याच्या एका खास मंत्र्याला या संवादाबद्दल सांगितले. मंत्री म्हणाला, ‘‘राजे तो सेवक ‘99 क्लब’चा सदस्य नसणार. त्याला आपण सदस्य करू, मग बदल पाहा.

’’ मंत्र्याने त्या सेवकाच्या घराबाहेर 99 सोन्याचे शिक्के ठेवले. ते मिळताच सेवक उल्हसित झाला. मोजल्यावर तो विचारात पडला, ‘‘99 शिक्के कुणी का ठेवेल. 1 नक्कीच कुणी घेतला असेल किंवा कुठेतरी पडला असेल.’’ आपला एक शिक्का कमी आहे या विचाराने त्याचे मन जळू लागले. तो कमावून आपण 100 शिक्क्याचा वाटा पूर्ण करायचाच या जिद्दीने तो कामाला लागला. दगदग, धडपड, तडजोड त्याच्या आयुष्याचा भागच झाले. कुटुंब मदत नाही करीत याची चीडचीड आणि नैराश्याने त्याला पछाडले. त्याने गाणेही बंद केले. हा बदल पाहून राजा स्तब्ध झाला. मंत्र्याला बोलावून त्याने हा बदल कसा घडला हे विचारले. मंत्री म्हणाला, ‘‘यालाच तर मी ‘99 क्लब’ म्हणतो. आता हा सेवक 99 क्लबचा सदस्य झाला आहे.’’
‘99 क्लब’ हे अशा माणसांच्या समूहाला दिले गेलेले नाव आहे, ज्यांच्याकडे खूप काही असूनही ते कधीच खूश नसतात. कारण ते 99 सोडून ‘1’ या संख्येमागे झुरत असतात. ‘ते एक मिळाले की सगळं चांगलं होईल, असे समजणारे संपूर्ण आयुष्य शोधात घालवितात. थोडक्यात मनुष्य सुखात राहू शकतो, पण काही मोठे हाती लागले की माणूस हावरा होतो. त्याला अजून हवे असे वाटू लागते. झोप, आनंद, आपल्यांची मनं, कुटुंबाचे हित, सर्व काही पणाला लावून माणूस हावरेपणाच्या आहारी जातो.


ऐषाराम आणि गरजा यातला फरक जाणून घ्या. गरजांवर नियंत्रण ठेवा. एका गोष्टीसाठी 99 गोष्टींना बेदखल करू नका. ‘99 क्लब’चे सदस्य होऊ नका

Rs. 500







In one of my training programmes, I started off my seminar by holding up a Rs.500 note in the room of 100, and I asked, "Who would like this Rs.500 note?"

Hands started going up.

I said, "I am going to give this Rs.500 to one of you but first, let me do this.

I proceeded to crumple up the Rs.500 note. I then asked, "Who still wants it?"

Still the hands were up in the air. Well, I replied, "What if I do this?" And I dropped it on the ground and started to grind it into the floor with my shoe.

I picked it up, now crumpled and dirty.

"Now, who still wants it?" Still the hands went into the air.

My friends, we have all learned a very valuable lesson. No matter what I did to the money, you still
wanted it because it did not decrease in value.

It was still worth Rs.500. Many times in our lives, we are dropped, crumpled, and ground into the dirt by the decisions we make and the circumstances that come our way.

We feel as though we are worthless. But no matter what has happened or what will happen, you will never lose your value. Dirty or clean, crumpled or finely creased, you are still priceless to those who
DO LOVE you.

The worth of our lives comes not in what we do or who we know, but by WHO WE ARE.

You are special- Don't EVER forget it."

You may never know the lives it touches, the hurting hearts it speaks to, or the hope that it can bring.
Count your blessings, not your problems.

And remember: Amateurs built the Ark . Professionals built the Titanic.

If God brings you to it - He will bring you through it.